१-
भारतीय
मुसलमानांसाठी -
भारतातील
मुसलमान हा उग्र स्वभावी नाही. हिंदूंच्या दीर्घकालीन सहवासाचा हा परिणाम असू
शकतो. सुफी परंपरा हे त्याचं उदाहरण आहे. हिंदू-मुसलमानांमधील सलोखा ही आपल्यासाठी
गर्वाची बाब आहे. कारण जगात असं उदाहरण कोठेही नाही. पण हा सलोखा तोडण्यासाठी
उत्सुक लोकं दोन्ही समाजांत आहेत हेही विसरून चालता येणार नाही. आणि जगातील
दहशतवादाला आळा घालायचा असेल तर भारतातून ती सुरूवात व्हायला पाहिजे. कारण त्याला
पोषक वातावरण इथे आहे. पण त्यात बरीच मजल गाठायची आहे. शरीया, मुस्लिम पर्सनल लॉ
बोर्ड, फतवे, तलाक, निरक्षरता, गरीबी यातून सुटका करून मुस्लिम समाजाला बाहेर
यावंच लागेल. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे धार्मिक श्रेष्ठत्वाच्या अहंकारातून
त्याला बाहेर पडावं लागेल. इस्लाम आणि पैगंबर हे अन्य धर्म व त्यांच्या
अवतारांसारखेच आहेत, हे त्यांना मान्य करावं लागेल. जे मुस्लिम नाहीत तेही
मेल्यावर त्यांच्या त्यांच्या स्वर्गात जातील, त्यांनाही मोक्ष मिळेलच हे त्यांनी
मान्य करायलाच पाहिजे. त्यांच्यातली धार्मिक हेकेखोरी जोवर नष्ट होणार नाही तोवर
त्यांची सुधारणा अशक्य आहे. आणि त्यासाठी आता अन्य धर्मियांनाही त्यांच्यावर दबाव
आणायलाच पाहिजे. त्यांचं त्यांना काय करायचं ते करू देत ही वृत्ती आपल्याला आता
परवडणार नाही. जितक्या धडाडीने हिंदू समाजात सुधारणा होत आहेत, धार्मिक कट्टरतेला
विरोध होत आहे, तितकाच विरोध मुस्लिम समाजातही निर्माण व्हायला हवा. हा आता आपण व
ते असा प्रश्न नाही तर आपण सारे माणसं आहोत व ते सिद्ध करण्याचा प्रश्न आहे.
कोणाच्या काय भावना दुखतात ते दुखू देत पण आता शांत राहून चालणार नाही. मुस्लिम
समाज जर एखाद्या बैलासारखा खाली बसलेला असेल तर त्याला तुराण्या टोचत पुन्हा
चालायला भाग पाडावंच लागेल. ती आपलीही जबाबदारी आहे.
No comments:
Post a Comment